सावंतवाडी: राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, आता हा मार्ग ‘शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गाला आता ‘राज्य महामार्ग क्रमांक १०’ चा दर्जा देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील १४ गावांमधून हा मार्ग जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बदलेला मार्ग आणि गावे:
सुरुवातीच्या अधिसूचनेनंतर आता प्रशासकीय पातळीवर मार्गामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इसापूर येथून हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करेल.
दोडामार्ग तालुका: कुंभवडे, फुकेरी, झोळंबे या ३ गावांतून हा मार्ग जाईल
Post a Comment