राज्यातील 24 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. राज्यात पुढील 48 तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज कोसळणे वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. आटपाडी सांगोला जत मंगळवेढा या भागात तुफान वारा होता. सांगोला तालुक्यात तब्बल दोन तास अवकाळी पाऊस कोसळला. आटपाडी तालुक्यात 20 ते 25 मिनिटे पाऊस पडला. त्यासोबत प्रचंड वारा होता. त्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर गळ झाली आहे.
वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment